Friday, August 24, 2018

आवश्यकता


इको-फ्रेंडली गणेशमूर्तीची आवश्यकता आताच्या काळातच का निर्माण झाली?

पूर्वीच्या काळी लाकडाच्या मातीच्या मूर्ती बनविल्या जायच्या ज्या विघटनशील असत. पण आताच्या काळात बनविल्या जाणार्याप्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि त्याचे रंगही अतिशय दुष्परिणाम घडवून आणणारे, आरोग्याला घातक असणारे, पाण्यात विरघळणारे असतात. म्हणूनच विसर्जनानंतर ह्या मूर्तींमुळे पर्यावरणाची हानी होते. घातक रसायनांमुळे पाण्याचा आम्ल गुणधर्म वाढतो आणि त्याच बरोबरीने त्यात वापरलेल्या धातुच्या कणांमुळे जलजीवनही धोक्यात येते. तसेच हे पाणी दैनंदिन वापरात आले तर मानव इतर सजीवही अनेक रोगांचे बळी ठरतात.

हे दुष्परिणाम टाळण्यासाठीसद्गुरु श्री अनिरुध्द उपासना फाऊंडेशनने आपल्या संलग्न संस्थांच्या सहकार्याने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याचा उपक्रम हाती घेतला. अशा मूर्ती विसर्जन केल्यानंतर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतात पुढे होणारी हानी आटोक्यात येण्यास मदत होते



२००५ सालापासूनअनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनामआणिश्री अनिरुद्ध आदेश पथकयांच्यामार्फत सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याचे काम चालू आहे. श्रद्धावानांनी लिहून जमा केलेल्या रामनाम वहीच्या जप लिहिलेल्या कागदाचा वापर करून मूर्ती तयार केल्या जातात.

No comments:

Post a Comment

Featured Post